PM Kisan Yojana
PM Kisan Yojana

भारतातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Governments) विविध योजनांवर काम करते. पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) ही देखील अशीच योजना आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात. म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.

केंद्र सरकार लवकरच पीएम किसान सन्मान निधीचा 2,000 रुपयांचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरि (Transferred) करणार आहे. 10 व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले.

अशा स्थितीत शेतकरी (Farmers) आता 11व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही तारखेला ही रक्कम सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवू शकते, असे मानले जाते.

तरी पण निधी पाठवण्यापूर्वी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जारी करण्यापूर्वी योजनेत काही मोठे बदल केले.

जर कोणत्याही शेतकऱ्याने ई-केवायसी (E-KYC) ची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर तो 11 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतो. शेतकऱ्यांना दिलासा देत सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे.

नवीन माहितीनुसार आता ही प्रक्रिया 22 मे 2022 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी उपलब्ध सुविधा देखील बदलली आहे.

आता तुमच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी पीएम किसान खात्यावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. याशिवाय या योजनेसाठी शिधापत्रिका क्रमांक देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

यासोबतच शिधापत्रिकेची पीडीएफ (PDF of ration card) प्रत तयार करून ती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे.