मुंबई : एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जची कमान अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सोपवली आहे. आता प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की IPL 2022 हा धोनीचा शेवटचा हंगाम असेल का? आता या प्रश्नाचे उत्तर फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिले आहे. आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी धोनीने कर्णधारपद सोडले असेल, परंतु आयपीएलचा 15 वा हंगाम हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम नसेल.
आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ असलेल्या सीएसकेच्या सीईओने सांगितले की, “आयपीएल २०२२ हा धोनीचा शेवटचा हंगाम असेल असे मला वाटत नाही. धोनी जरी खेळत नसला तरी तो संघासाठी मार्गदर्शक शक्ती असेल, याची पुष्टी विश्वनाथनने केली आहे.
यापूर्वी सीएसकेने एक निवेदन जारी केले होते की धोनीने संघाचे कर्णधारपद दुसऱ्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी त्याने रवींद्र जडेजाची निवड केली आहे, जो 2012 पासून सीएसकेचा महत्त्वाचा सदस्य आहे. धोनी या हंगामात आणि त्यानंतरही सीएसकेचे प्रतिनिधित्व करत राहील.
विश्वनाथन पुढे म्हणाले की, “कर्णधारपद सोडण्याचा निर्णय पूर्णपणे धोनीचा होता. चार वेळचा चॅम्पियन CSK 26 मार्च रोजी KKR विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. धोनीला आयपीएलच्या शेवटच्या मोसमात फलंदाजीत यश मिळू शकले नाही. त्याने 16 सामन्यात 114 धावा केल्या होत्या, पण त्याने संघाला नक्कीच चॅम्पियन बनवले.