Maharashtra News : देशातील कोळशाचा साठा कमी झाला आहे. आज देशात फक्त ९ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक राहिला आहे. याआधी १४- १५ दिवसांचा साठा शिल्लक असायचा.
कोळशाची मागणी वाढली आहे हे खरं आहे. पण पुरवठा तितका जलद करणं शक्य नाही, असं केंद्रीय उर्जा मंत्री आर के सिंह यांनी सांगितलं आहे.
यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांत वीज टंचाईची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणावर भारनियमन करण्याची वेळ येणार आहे. देशात जवळपास १० राज्यांवर कोळसा संकट निर्माण झाले आहे.
उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे.
तसंच, झारखंड, बिहार, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये मागणीच्या तुलनेत कमी वीज उपलब्ध होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास २१ ते २२ हजार मेगावॅट वीजेची मागणी आहे.
मात्र, तिथे फक्त १९ ते २० मेगावॅटपर्यंत वीजेचा पुरवठा केला जात आहे. महाराष्ट्रात कोळसा टंचाई आहे की नाही, कोणामुळे ही स्थिती आली आहे, यावर राजकीय चर्चा सुरू असताना केंद्र सरकारनं प्रथमच कोळसा टंचाई असल्याचं मान्य केलं आहे.
उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये कोळसा टंचाई नाही. मात्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात कोळसा टंचाईची भीषण परिस्थिती झाली असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री सिंह यांनी सांगितंल. या राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली त्यामागं वेगवेगळी कारणं आहेत.
तामिळनाडू राज्य आयात केलेल्या कोळसावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोळशाचे दर वाढले आहेत. त्यामुळं आम्ही तामिळनाडू सरकारला कोळसा आयात करण्याचे आदेश दिले आहेत.
तर, आंध्र प्रदेशमध्ये रेल्वे मार्गाने कोळसा पुरवला जातो. मात्र रेल्वेने कोळसा पोहोचवण्यास विलंब होत आहे. तसंच, रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटकाही बसला आहे, असं सिंह यांनी म्हटलं आहे.